आज रविवार असूनही रेणू बरोब्बर सकाळी सहा वाजता उठली. तशी तिला उशिरापर्यंत झोपायची मुळी सवयच नव्हती. कारण तिची रोज सकाळची आठची शाळा असायची. आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा तिचे बाबा तिला सकाळी सात वाजल्यानंतर कध्धीच झोपू द्यायचे नाहीत. त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की, सकाळी लवकर उठलं की दिवस कसा मोठ्ठा मिळतो, खूप ताजंतवानं वाटतं आणि सगळी कामंही प्रसन्न मनाने होतात.
पण आज रविवारच्या मानाने मात्र रेणू खरोखरच लवकर उठली होती. तिने पांघरुणाची व्यवस्थित घडी करून ठेवली. पटकन दात घासले आणि धावतच ती बाल्कनीमध्ये गेली. तिच्या लाडक्या मोगऱ्याला भरपूर फुलं आली होती. तिला मोगऱ्याची पांढरीशुभ्र फुलं खूप आवडायची. म्हणून आई-बाबांनी तिला काही दिवसांपूर्वी तिच्या वाढदिवसाला मोगऱ्याचं एक रोप भेट दिलं होतं. रेणू त्याला नित्यनेमाने सकाळ-संध्याकाळ पाणी घालायची, नीट ऊन मिळतंय का ते पाहायची, त्याच्या कुंडीमध्ये खत घालायची, त्याची भरपूर काळजी घ्यायची. टपोऱ्या पांढऱ्या फुलांमुळे आज झाड खरंच खूप सुरेख दिसत होतं.
रेणू खूश झाली. ती उडय़ा मारत हॉलमध्ये आली. आई-बाबा, आजी-आजोबा चहा घेत, पेपर वाचत बसले होते. रविवार असल्यामुळे सगळेच एकदम निवांत होते.
‘‘बाबा, प्रॅक्टिस करायची?’’ रेणू उत्साहाने म्हणाली. आई रेणूसाठी दूध घेऊन आली.
‘‘अगं हो! दूध तर घेशील की नाही? आणि प्रॅक्टिस करायला सगळं आवरून बसायचं. गाणं ही विद्या आहे नं! मग असं पारोसं नाही बसायचं गायला.’’ बाबांनी समजावलं. रेणू दूध प्यायला टेबलापाशी बसली.
‘‘मला सांग रेणू, आजचा कार्यक्रम कशाकरता आहे गं?’’ आजोबांनी विचारलं.
‘‘दोन दिवसांनी गुरूपौर्णिमा आहे नं, म्हणून.’’ रेणू पटकन म्हणाली.
‘‘अगं, पण गुरूपौर्णिमा म्हणजे काय?’’ बाबांनी विचारलं. रेणूला याबद्दल फारशी माहिती नव्हती. ती गेले दोन-तीन आठवडे फक्त ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम’, ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम’ एवढा एकच जप करत होती. त्यामुळे घरच्यांनाही तिला याची माहिती करून द्यायचीच होती.
‘‘रेणू, पूर्वीच्या काळी म्हणजे हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशात गुम्रू-शिष्य परंपरा होती. तुमच्या आज जशा टीचर्स असतात नं, ते म्हणजे तेव्हाचे गुरू आणि तुम्ही सगळी मुलं म्हणजे शिष्य. मुलं सात-आठ वर्षांची, म्हणजे साधारण तुझ्या वयाची झाली, की त्यांना त्यांच्या गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवायचे. त्यांच्या या शाळेला ‘गुरुकुल’ असं म्हणायचे. आपलं घर सोडून शिक्षण संपेपर्यंत ते त्यांच्या गुरुजींच्याच घरी राहायचे. गुरुजी सांगतील ती सगळी कामं करायचे आणि त्याचबरोबर खूप अभ्यासपण करायचे. आपले गुरू आपल्याला खूप काही नवीन-नवीन शिकवतात, ज्ञान देतात म्हणून त्यांना ‘थँक यू’ म्हणण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करतात. महाभारत लिहिणाऱ्या महर्षी व्यासांना आपण श्रेष्ठ गुरूमानतो. म्हणून या पौर्णिमेला ‘व्यास पौर्णिमा’असंही म्हणतात. समजलं?’’ आजोबांनी सांगितलं. रेणू मन लावून ऐकत होती.
‘‘तुझ्या रूममध्ये तो श्रीकृष्णाचा फोटो आहे नं, त्याचे गुरू होते मुनी सांदिपनी. असं म्हणतात की, श्रीकृष्णाने त्यांच्या घरी लाकडेही वाहिली होती. एकदा कृष्णाला असं कळलं, की शंकासुर नावाच्या एका राक्षसाने सांदिपनींच्या मुलाला बरेच दिवस त्याच्याजवळ कैद करून ठेवलंय. गुरुदक्षिणा म्हणून मग त्याने त्या राक्षसाच्या कैदेतून सांदिपनी मुनींच्या मुलाची सुटका केली.’’ आजोबांनी पुढे माहिती दिली.
‘‘गुरुदक्षिणा म्हणजे काय आजोबा?’’ रेणूचा प्रश्न.
‘‘म्हणजे शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुजींना दिलेली ‘फी’. पण ती पैशांच्या रूपांतच असायला लागत नाही.’’ बाबा म्हणाले.
‘‘तुला मध्ये मी अर्जुन-द्रोणाचार्याची गोष्ट सांगितली होती, आठवतंय?’’ आजीने विचारलं.
‘‘हो! आणि एकलव्याची पण!’’ रेणू म्हणाली. तिला आजीकडून गोष्टी ऐकायला खूप आवडायचं.
‘‘तर त्या गोष्टीमधले द्रोणाचार्य हे अर्जुनाचे गुरू होते, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली. एकलव्यलाही त्यांच्याकडून धनुर्विद्या शिकायची होती. पण ते एकलव्यला धनुर्विद्या शिकवायला तयार झाले नाहीत. तेव्हा एकलव्याने द्रोणाचार्याची एक मूर्ती बनवली, तिलाच गुरू मानलं आणि धनुर्विद्य्ोचं शिक्षण स्वत:च घेतलं. जेव्हा द्रोणाचार्याना हे समजलं तेव्हा ते घाबरले. कारण त्यांनी अर्जुनाला श्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन दिलं होतं. गुरुदक्षिणा म्हणून मग त्यांनी एकलव्यचा अंगठा कापून मागितला, म्हणजे त्याला धनुष्य-बाण चालवताच येणार नाही.’’ आजी सांगत होती.
‘‘पण हे चुकीचं आहे!’’ रेणू कळवळून म्हणाली.
‘‘हो! चुकीचंच आहे. पण एकलव्यानेही कुठलाही विचार न करता त्याचा अंगठा कापून देऊन टाकला. म्हणून एकलव्याला एक श्रेष्ठ शिष्य मानतात. कधीकधी गुरूपेक्षा शिष्य श्रेष्ठ ठरतो, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.’’ आजी म्हणाली.
‘‘पण मग मलाही कुणी गुरू आहे?’’ रेणूचा निरागस प्रश्न.
‘‘तुझ्या टी
0 comments:
Post a Comment