तुम्हाला माहीत आहे?? *अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…*

*अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…*

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ३ जुन २००९ रोजी राज्यपाल जे.जे.सिंग यांच्या हस्ते  *अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक* उद्घाटन करण्यात आले. तसेच  *तवांग ते बुम्ला या २२ किमी मार्गाला छत्रपती शिवाजी मार्ग* असे नावही देण्यात आले. तवांगमधल्या स्मारकातील शिवछत्रपतींची नजर चीनच्या दिशेने आहे. म्हणजेच राजे आपल्या करड्या नजरेतुन शत्रुकडे लक्ष ठेऊन आहेत.
कर्नल संभाजी पाटील निवृत्तीनंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला
*“जय हिंद सर, दोरजी खांडु बोल रहा हुँ सर…”*

कर्नल साहेब एकदम २५ वर्षं मागे गेले. त्यांना आठवला तो अरुणाचल प्रदेश आणि तिथला सकाळी सूर्याच्या किरणांनी सोनेरी होणारा हिमालय. कर्नल संभाजी पाटील हे १९८३-८४ मध्ये  *२२ मराठा लाईट इंफंट्री युनिटचे कमांडर* म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी तवांग ते बुम्ला हा रस्ता तयार करण्याची कामगिरी त्यांनी पार पडली.
हा रस्ता म्हणजे भारत-चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा आहे.  *संरक्षणदृष्ट्या या रस्त्याचे महत्त्व खुप महत्व आहे.* सीमेवरील सैनिकांना जलद रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात आला होता. मराठा लाईट इंफंट्रीच्या २००० जवानांनी उणे ३०℃ तापमानात काम करुन केवळ पाच महिन्यात हा बावीस किमीचा मार्ग तयार करुन दाखवला.
समुद्र सपाटी पासुन तब्बल १२४०० फुट उंचीवर असणारा अरुणाचल प्रदेशातील हा अतिशय दुर्गम असा भाग. अशा भागात काम करणे खुपच अवघड. रस्ता बांधण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेणे खुपच आवश्यक होते. या सगळ्या कामात कर्नल संभाजी पाटलांची ओळख *दोरजी खांडु* या तवांग भागातील एका उत्साही युवा नेतृत्वासोबत झाली. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

*दोरजी खांडु*  नित्यनेमाने मराठा लाईट इंफंट्री युनिटला भेट देत असत व युनिटला काही मदत लागल्यास ती गावातील लोकांच्या मदतीने करत असत. या काळातच त्यांना मराठा लाईट इंफंट्रीच्या बेळगाव येथील मुख्यालयात खास प्रशिक्षणासाठी सुद्धा पाठवण्यात आले होते. दोरजी खांडु व मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांमध्ये एक खुप चांगले नाते निर्माण झाले होते. *हेच खांडु नंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.*
मराठा लाईट इंफंट्री युनिटने बांधलेला हा २२ किलोमीटरचा रस्ता म्हणजे तवांग भागातील अरुणाचली बांधव आणि २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांचे देशासाठी दिलेले खुप मोठे योगदान होते. हा रस्ता केवळ कर्नल संभाजी पाटील व दोरजी खांडु यांच्या मैत्रीचेच प्रतिक नाही, तर पश्चिमेकडील मराठी आणि अतिपुर्वेकडील अरुणाचली नागरिकांच्या मैत्रीचेही ते प्रतिक आहे.
दोरजी खांडु यांनी या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर स्थानिक अरुणाचली बांधवांच्या वतीने २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसाठी एका मेजवानीचे आयोजन केले होते. इंफंट्रीच्या सर्व जवानांचा त्यात गौरव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी काही रोख रक्कम बक्षीस म्हणुन २२ मराठा लाईट इंफंट्री युनिटसाठी देऊ केली. परंतु इंफंट्रीच्या सर्व जवानांनी ती रक्कम साभार परत केली आणि अरुणाचली बांधवांना विनंती केली की “हा रस्ता महाराष्ट्र-अरुणाचल मधील बांधवांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. या रस्त्याला तमाम महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे. तसेच या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची दोन स्मारके उभी करावीत. त्यातले एक तवांग युद्ध स्मारकाजवळ व दुसरे या रस्त्यातील एखाद्या महत्वाच्या ठिकाणी असावे.”
दोरजी खांडु आणि स्थानिक अरुणाचली बांधवांनी कसलाही वेळ न लावता तात्काळ ही मागणी मान्य केली. मराठा लाईट इंफंट्रीने निर्माण केलेला तवांग-बुम्ला रस्ता आज छत्रपती शिवाजी मार्ग या नावाने ओळखला जातो. पुढे दोन महिन्यातच अरुणाचल बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अर्धाकृती स्मारक तवांग-बुम्ला रस्त्यावरील एका महत्वाच्या जागी उभे केले. तसेच तवांग येथे छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा ही उभा केला.
*शिवछत्रपतींच्या शिल्पाच्या अर्पण समारंभात २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसोबत दोरजी खांडु यांना मराठा लाईट इंफंट्रीचे स्फुर्तीगीत खड्या आवाजात गाताना बघुन अनेकजणांना आश्चर्य वाटले.*

*मर्द आम्ही मराठे खरे, शत्रुला भरे कापरे ।*
*देश रक्षाया, धर्म ताराया,*
*कोण झुंजीत मागे सरे ।। धृ ।।*

*वादळापरी आम्ही पुढेच चालतो,* *जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो ।*
*मराठा कधी न संगरातुनी हटे,* *मारुनी दहास एक मराठा कटे ।*
*सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे ।।१।।*

*व्हा पुढे अम्हा धनाजी, बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती ।*
*विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पुर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी ।*
*घेऊ शत्रुवरी झेप वाघापरी, मृत्यु अम्हा पुढे घाबरे ।।२।।*

*भारता आम्ही तुलाच देव मानतो,*
*हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो ।*
*राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा ।*
*ह्याच मातीवरी प्राण गेला तरी, अमुची वीर गाथा उरे ।।३।।*

*बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की …जय !*

अशा विजयाच्या घोषणांनी तवांग-बुम्ला परिसराचा आसमंत दुमदुमुन गेला.

संदर्भ..
*The Governor of Arunachal Pradesh*

*(Press Release : Governor)*

Love Tips

👉 _*प्रेम फुलवण्यासाठी 'या' गोष्टी टाळा...*_

Love Tips

नाते जोडणे खूप सोपे असते, पण ते टिकवणे तेवढेच कठीण असते. नाते उत्तमरीत्या टिकवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण यावरच कोणत्याही नात्याचा पाया रचलेला असतो. कोणत्या आहेत या गोष्टी यावर एक नजर...

👉 _*आग्रह टाळा*_ : सतत आपल्या जोडीदाराच्या सवयींमध्ये किंवा त्याच्या स्वभावामध्ये चुका काढणे, त्याला कमी लेखणे टाळायला हवे. आपल्या जोडीदाराने आपण म्हणतो तसेच राहायला हवे किंवा वागायला हवे हा आग्रह टाळायला हवा.

👉 _*स्वातंत्र द्या*_ : आपल्या जोडीदाराचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून त्याचीही अनेक बाबतीत आपल्यापेक्षा निराळी मते असू शकतात हे समजून घ्या. जर दोघेही आपले विचार एकमेकांवर सतत लादत राहिले, तर त्या विचारांचे ओझे वाटायला लागते.


👉 _*टिंगल टाळा*_ : चारचौघांमध्ये आपल्या जोडीदाराची कोणत्याही कारणाने टिंगल करणे टाळा. असे करून तुम्ही इतरांनाही आपल्या जोडीदाराची टिंगल करण्यास प्रवृत्त करीत असता.

👉 _*सल्ले टाळा*_ : आपला जोडीदार करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ले देणे टाळा. त्याने काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावेत, किती पैसे कसे खर्च करावेत या बाबतीतले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या दोन्ही लोकांना असले पाहिजे.

👉 _*समोरच्याचा विचार करा*_ : प्रत्येक वेळी आपल्या जोडीदाराला बरे वाटावे म्हणून त्याच्या मनाप्रमाणे वागत राहणे आणि आपण सतत त्याग करतो आहोत हे दाखवून देणे ही रिलेशनशिप तुटण्यामागचे कारण आहे. त्यामुळे नात्यामध्ये दोघांच्याही मतांचा, इच्छांचा बरोबरीने विचार व्हायला हवा.

👉 _*दोष देणे टाळा*_ : एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही की त्याचा दोष आपल्या जोडीदाराला देण्याकडे काहींचा कल असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नसली, तरी त्यामागील कारणांचा शांतपणे विचार करा.

👉 _*तुलना करू नका*_ : आपल्या जोडीदाराची, इतरांच्या जोडीदारांशी तुलना करणे आवर्जून टाळा. रंगरूप, आर्थिक प्राप्ती, वागण्या-बोलण्याच्या सवयी, शिक्षण या बाबतीत आपल्या जोडीदाराची इतरांशी तुलना करून त्याला कमी लेखू नका.

👉 _*संभाषण साधा*_ : सर्व बाबतीत आपल्या जोडीदाराशी संभाषणाचा मार्ग नेहमी मोकळा ठेवा. रिलेशनशिपमध्ये मतभेद होतात, वाद ही होतात. पण अशी कोणतीही अडचण नाही ज्यातून संभाषणाद्वारे मार्ग निघत नाही. त्यामुळे एकमेकांशी संभाषण साधा.

HAPPY NEW YEAR 2018 TO ALL MY READERSSSSSSSSSSSSSSSSS


तू अन मी .....



हिरव्यागार रानात 
निळ्याशार नभात
तू अन मी .....

सागराच्या पाण्यात
केवड्याच्या बनात
तू अन मी .....

गार गार वाऱ्यात
उन्हाच्या पाऱ्यात
तू अन मी .....

गरमागरम वाळवंटात
गारेगार बर्फात
तू अन मी .....

सोनेरी उन्हात
काळ्याश्या नभात
तू अन मी .....

तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?*_

👉 _*तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?*_

_*LetsUp I Current Affairs*_

बँक, मोबाईल नंबर, पॅन कार्ड आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आधार कार्ड वापरले जात असल्याने त्याची खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच तुमचे आधार कार्ड कुठे वापरले तर जात नाही ना, याची पडताळणी करणे महत्वाचे ठरते. आता uidai ने हि सुविधा आधारधारकांना दिली असून वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आधारचा वापर कुठे होतोय हे चेक करू शकता.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/m9sEMa )*_ 

1) सर्वात आधी https://resident.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

2) या संकेतस्थळावर Aadhaar Authentication History वर क्लिक करा.

3) यानंतर OTP जनरेट करा, तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP नंबर येईल.

4) OTP नंबर टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळतील. त्यानंतर निश्चित वेळेत तुम्हला तो टाकावा लागेल.

5) तुमच्या आधार नंबरच्या डिटेल्सवरून तो कधी कधी वापरला गेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये जर काही गडबड असेल तर तुम्ही तक्रार करू शकता.

6) जर खरच तुमच्या आधारचा गैरवापर होत असेल तर तुम्ही आधार ऑनलाइन लॉक करू शकता.

👉 _*2023 चा वर्ल्डकप भारतात रंगणार*_

2023 चा वनडे वर्ल्डकप आणि 2021 ची चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या मानाच्या स्पर्धांचे यजमानपद भारताकडे असणार आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारताने याआधी 1987, 1996 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्डकपचे यजमानपद भूषविले आहे.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकपच्या यजमानपदासह भातीय संघ अफगाणिस्तानच्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपदही भूषविणार आहे. 2019-2020मध्ये हा सामना भारतात होईल. सोबतच या बैठकीत 2019 ते 2023 पर्यंतचा भारतीय संघाचा कार्यक्रमही जाहीर झाला. या पाच वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर 306 दिवसात 81 सामने खेळणार आहे.

👉 _*फेसबुकचे नवीन ‘ग्रीटिंग्ज फिचर’*_

फेसबुकवर लवकरच नवीन फिचर येणार असून ‘ग्रीटिंग्ज फिचर’असे या नव्या फिचरचे नाव आहे. फेसबुकच्या या ग्रीटिंग फिचरद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेगळ्या पद्धतीने चॅट करू शकणार आहात. या नवीन फिचरमधून तुम्ही पोक, विंक किंवा हाय-फाय हेही पर्याय उपलब्ध होणार आहेत. सध्या या फिचरची चाचणी ब्रिटन, थायलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया आणि फ्रान्स येथे सुरू असून लवकरच ते जगभरात लाँच होणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/m9sEMa )*_

गाव

➰➰➰➰➰➰➰➰➰
*।।गाव।*

खरं खरं सांगतो राव,
उगीच न्हायी ठेवत नाव....

या मोबाइलनं बिघडवलं
आता सारं माझ गांव....

वडाचा मोठा पार होता,
वारा थंडगार होता.....

गप्पा ,निरोप,खुशाली,
कहाण्यांचा बाजार होता....

काय चाललंय?कसं चाललंय?
एकमेकांत संवाद हाेता....

कबड्डी होती,कुस्ती होती,
आट्या - पाट्या,लपा-छपी,

सुर-पारंब्यावरचे झोके होते,
ओढ्याच्या डोहात पोहणे हाेत.

आंब्याच्या झाडावरच बसून,
कच्चे-पिकलेले आंबे खायची मजा होती...

विटी-दांडु,खेळाचं मैदान होतं,
इतर अनेक मैदानी खेळ होते...

उनाडक्या होत्या,मस्ती होती,
आप-आपसात मेळ होता...

चिंचा होत्या,बोरं होती,
आंबे होते,ऊस होता...

गोठाभर ढोरं होती...
ढोरां बरोबर पाेर हाेती....

जिवाला जीव देणारे,
दिलदार मित्र होते......

किर्तन होतं,भजन होतं,
जात्यावरचं गाणं होतं.…

शाळेतल्या कवितेला,
आनंदाचं उधाण होतं...

पण..............

जसं गावात हा कोठून,
मोबाइल आला,नेट आलं....

चँनलच कनिक्शन,
घरा घरात थेट आलं...

गजबजलेलं गाव माझं,
आता निर्जन बेट झाले....

सकाळ संध्याकाळ सारी माणसं,
टीव्हीलाच चिकटून राहिली..

रस्त्यावर वर्दळ करणारी माणसे,
टी वी पुढंच सेट झालीत.....

मैदानावरील मुलं सारी,
देवळामागच्या अंधारात...

मोबाइल मध्येच गुंतली सारी......

सुने सुने झाले वडाचे पार,
मुके झाले देवळाचे ओटे....

दिवस-रात्र मोबाईल वर,
नुसती फिरवत राहतात बोटे.....

खरं-खरं सांगतो राव.....
या मोबाइलनंच बिघडवलं माझं सारं गाव !
✨✨✨✨✨✨✨

पीडीएफ स्वरुपातील उपलब्ध लेख*

🌳 *कृषिसमर्पण* 🌳

_*सप्रेम नमस्कार...*_

आपल्या *कृषिसमर्पण* समूहाद्वारे आजतागायत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या *पीडीएफ* स्वरुपातील सर्व लेख आपणांकरिता एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत... याकरिता आपण आपल्या समूहाच्या टेलिग्राम चैनेलला फॉलोव करावयाचे आहे... जवळपास ३५ सविस्तर लेख आपण पीडीएफ स्वरुपामध्ये उपलब्ध करुन दिलेले आहेत...

📚 *पीडीएफ स्वरुपातील उपलब्ध लेख* 📚
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

👉🏻 हरभरा लागवड
👉🏻 म्हशींच्या जाती
👉🏻 लिंबू लागवड
👉🏻 शेवगा लागवड
👉🏻 संञा-मोसंबी आंबे बहार व्यवस्थापन
👉🏻 डाळिंब आंबे बहार व्यवस्थापन
👉🏻 सीताफळ लागवड
👉🏻 हळद लागवड
👉🏻 डाळिंब हस्त बहार व्यवस्थापन
👉🏻 द्राक्ष अॉक्टोबर छाटणीपासूनचे व्यवस्थापन
👉🏻 पपई जाती व रोपनिर्मिती
👉🏻 बांबू लागवड
👉🏻 भुईमूग लागवड
👉🏻 भेंडी लागवड
👉🏻 कोरपड लागवड
👉🏻 मिरची लागवड
👉🏻 खरबूज लागवड
👉🏻 खजूर लागवड
👉🏻 कलिंगड लागवड
👉🏻 कांदा प्रक्रिया उद्योग
👉🏻 कांदा बीजोत्पादन
👉🏻 गवती चहा लागवड
👉🏻 गांडूळ खत
👉🏻 झेंडू लागवड
👉🏻 अननस लागवड
👉🏻 ॲस्टर लागवड
👉🏻 आंबा पुनरुज्जीवन
👉🏻 आंबा मोहोर संरक्षण
👉🏻 आंबा सघन लागवड
👉🏻 ईएम द्रावणे
👉🏻 अॉईल पाम लागवड
👉🏻 कढीपत्ता लागवड
👉🏻 हिरवळीचे खते
👉🏻 कांदा लागवड
👉🏻 अंजीर लागवड

सदर लेख विविध वर्तमानपञे, विशेषांक, साप्ताहिके तसेच मासिकांमध्ये प्रकाशित झालेले असून यापैकी काही लेखांना *उत्कृष्ठ लेखन* पारितोषिकही मिळालेले आहे...

शेतकरी बंधू-भगिनींच्या मागण्यांना मान राखून लिहिलेले हे सविस्तर लेख काळजीपूर्वक वाचा... संग्रही ठेवा... आपल्या परिचितांना याविषयी नक्की कळवा...

*आपल्या समूहाच्या टेलिग्राम चैनेलचा दुवा...* 👇🏻
https://t.me/krushisamarpan
👆🏻 येथे क्लिक-टच करुन आजच्या आपल्या टैलिग्राम चैनेलचे फॉलोवर बना व मिळवा एकात्मिक शेतीची हंगामनिहाय माहिती, शेतीपुरक व्यवसायांची शास्ञोक्त माहिती...

आपल्या एंड्रोइड मोबाईलमध्ये 'टेलिग्राम' हे ॲप इंस्टॉल नसेल तर सर्वप्रथम हे 'गुगल प्ले स्टोअर'वरुन हे डाऊनलोड करुन ते इंस्टॉल करा..

*टेलिग्राम ॲप डाऊनलोड करण्यासाठीचा दुवा...*
https://play.google.com/store/apps/details?id=org.telegram.messenger

_*​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​*_

*​​फेसबूक ग्रूप-​​* 👇🏻
https://www.facebook.com/groups/1793392297578307/

🎖 *अत्यंत अल्पावधीमध्ये '1 लाखांपेक्षा जास्त व्हिवस्' मिळवलेल्या एकात्मिक शेतीविषयक अग्रगण्य ब्लॉगला आजच भेट द्या...* 🎖
krushisamarpan.blogspot.in

_*अधिकाधिक शेअर करा...*_

मीठाचे 'हे' उपयोग तुम्हाला माहिती आहेत का?*_

👉 _*मीठाचे 'हे' उपयोग तुम्हाला माहिती आहेत का?*_

_*LetsUp I Tips & Tricks*_

जेवणाची चव वाढवण्यासोबतच मीठाचे अनेक फायदे आहेत. यामध्ये उपलब्ध सोडियम बॉडीला आजार आणि इंफेक्शनपासून वाचवते. पण या व्यतिरिक्तही मीठाचे अजून काही महत्वपूर्ण उपयोग आहेत, जे तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी ठरतील. चला तर मग पाहूया मीठाचे काही उपयोग...

👉 शरीरावरील मृत त्वचा काढण्यासाठी अंघोळीनंतर त्वचा ओली असताना कोरड्या मिठाने घासावी. यामुळे रक्ताभिसरणदेखील वाढते. हा मसाज झाल्यावर पुन्हा अंग पाण्याने स्वच्छ करावे.

-------------------------------
*तुमचा सीबील स्कोर चेक करण्यासाठी क्लिक करा* 👉 https://goo.gl/nP1UCh
-------------------------------

👉 मीठाच्या पाण्याने नियमित अंघोळ करुन शरीराची आखड दूर करता येते. हे संधीवात, शुगर किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे मासपेशिंमध्ये होणा-या वेदना दूर करते.

👉 जर तुमच्या शरिरावर मधमाशीने डंख केला असेल तर वेदना होणार्‍या जागेवर मीठ लावा. वेदना आणि सूज दोन्हीही गायब होतील.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/rWVQVi )*_

👉 कधी कधी दिवसभरातील कामाच्या अतिरेकात डोळ्यांना ताण आणि थकवा जाणवतो. अशावेळी कोमट मीठाच्या पाण्यात एखादं स्वच्छ कापड भिजवा, आणि ते डोळ्यांवर ठेवून काहीवेळासाठी आराम करा. डोळ्यांचा त्रास कमी होईल.

👉 एक चमचा मीठ हे उत्तमप्रतिचे दंतमंजन आहे. एक चमचा मीठ आणि बेकिंग पावडर यांच्या मिश्रणाने रोज दात घासल्यास, दातांचा पिवळसरपणा जाऊन दात पांढरेशुभ्र होतात.

👉 अर्धा चमचा मीठ आणि बेकिंग पावडर एक कप पाण्यात घालून त्याच्या गुळण्या केल्यास तोंडातील दुर्गंधी नष्ट होते.

👉 अंघोळीदरम्यान थोडेसे मीठ डोक्यावर टाकून केस धुतल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होतो.

👉 घसा खराब झाल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यातील सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मामुळे घशाला आराम पडतो.

👉 बर्‍याचदा सफरचंद, बटाट्यासारख्या फळांचे काप उघड्यावर ठेवल्यास थोड्याच वेळात त्याच्यावर लालसर डाग दिसू लागतात. हे डाग न येण्यासाठी या फोडी मीठाच्या पाण्यात ठेवा.

👉 फ्रिज साफ करताना बेकींग सोडा आणि मीठाच्या पाण्याचे मिश्रण वापरा. यामुळे फ्रीजमधले सगळे डाग सहज दूर होतील. सोबत फ्रीजचे अंतरंग गंधमुक्त आणि चमकदारही होईल.

👉 घरामध्ये तांब्यापासून बनलेला वस्तू किंवा भांडी असतील तर त्यांना चमक आणण्यासाठी व्हिनेगर आणि मीठ एकत्र करून पॉलीश करा.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/rWVQVi )*_

संत्रा, मोसंबी, लिंबू सल्ला*

🌳 *कृषिसमर्पण* 🌳

🍊 *संत्रा, मोसंबी, लिंबू सल्ला* 🍊

डिसेंबर महिन्यामध्ये लिंबूवर्गीय फळबागेमधील विविध स्थिती असून, त्यानुसार योग्य काळजी घ्यावी.

_*- डाॅ एम. एस. लदानिया, दिनकरनाथ गर्ग*_

https://www.facebook.com/groups/1793392297578307/

🍊 *अांबीया बहर व्यवस्थापन* 🍊

- अांबीया बहराच्या फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर त्वरित काबेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अांबीया बहर घेण्याकरिता झाडाला ताबडतोब ताण द्यावा. पाणी देऊ नये. अधिक चांगल्या प्रकारे ताण देण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये क्लोरमेक्वॉट क्लोराईड २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- झाडाखालील तणे काढून बाग स्वच्छ करावी.
- बुंध्याजवळ मातीचे ढीग असल्यास त्यांना तोडून मोकळे करून घ्यावे.

🍊 *मृग बहर व्यवस्थापन* 🍊

- मृग बहर धरलेल्या संत्रा व मोसंबी झाडांसाठी ठिंबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. या काळात ६ वर्षांच्या झाडाला प्रतिदिन ४१ लिटर, ८ वर्षांच्या झाडाला ६५ लिटर, आणि १० वर्षांच्या झाडाला ८२ लिटर पाणी द्यावे.
- लिंबू झाडांसाठी ६ वर्षे वयाच्या झाडाला प्रतिदिन २३ लिटर, १० वर्षांच्या झाडाला ७५ लिटर पाणी द्यावे.
- मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, फवारणी
- एक ग्रॅम जिबरेलिक आम्ल अधिक मोनो पोटॅशिअम फाॅस्फेट किंवा डाय अमोनियम फॉस्फेट किंवा पोटॅशिअम नायट्रेट यापैकी एक १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी.
- १५-२० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

https://www.facebook.com/groups/1793392297578307/

🐛 *कीड व्यवस्थापन* 🐛

लिंबूवरील पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,फवारणी प्रतिलिटर पाणी
क्विनालफाॅस दीड मिलि किंवा नोव्हॅल्युरॉन १ मिलि. किंवा डायमिथोएट १.५ मिलि.
- आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कीटकनाशक बदलून पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
- या महिन्यामध्ये मृग बहरांच्या फळांवर कोळी कीडीचा प्रादुर्भाव दिसतो. कोळी प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. पुढे हळूहळू ते काळ्या रंगाचे होतात. स्थानिक भाषेमध्ये त्याला ‘लाल्या’ संबोधले जाते.
- कोळी नियंत्रणाकरिता, फवारणी प्रतिलिटर पाणी
डायकोफाॅल १.५ मिलि. किंवा इथिआॅन २ मिलि. किंवा द्राव्य गंधक ३ ग्रॅम
- आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

🍋 *रोग व्यवस्थापन* 🍋

- झाडाच्या बुंध्यावर २ फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद व १ किलो चुना प्रत्येकी ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट करावी.
- संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास तीक्ष्ण चाकूने खरडून स्वच्छ करून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल यांची पेस्ट बनवून लावावी.

☎  *अधिक माहितीकरिता संपर्क-*
*डाॅ. एम. एस. लदानिया*,
०७१२-२५००३२५
*दिनकरनाथ गर्ग*,
९८२२३६९०३०
(केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

📚 *स्ञोत-* ॲगोवन

_*​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​*_

*​​फेसबूक ग्रूप-​​*
https://www.facebook.com/groups/1793392297578307/

*​​टेलेग्राम चॅनेल-​​*
https://t.me/krushisamarpan

🎖 *अल्पावधीमध्ये '1 लाखांपेक्षा जास्त व्हिवस्' मिळवलेल्या एकात्मिक शेतीविषयक अग्रगण्य ब्लॉगला आजच भेट द्या...* 🎖
krushisamarpan.blogspot.in

_*अधिकाधिक शेअर करा...*_