राजीव काळे
कॉलेज अभ्यासक्रमात लावण्यात येणा-या कादंबरीत हे घटक चालू शकतात, असं अभिव्यक्तीवाल्यांचं म्हणणं असेल, तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं. कादंबरीवरील प्रत्येक आक्षेपाचं मुद्देसूद उत्तर द्यावं. त्यासाठी केवळ आविष्कारस्वातंत्र्याची ढाल पुढे करून कसं चालेल? तसं असेल तर मग हीदेखील एक आंधळी झुंडशाहीच झाली. आविष्कारस्वातंत्र्य म्हणजे आविष्कारस्वातंत्र्य, त्यापुढे कुणी बोलता कामा नये, असा दुटप्पी व्यवहार कसा चालेल?
..................
कवितेत अर्थांतरन्यास जेव्हा प्रभूच्या दयेतूनही कोसळे,
या संहितेला नवे शील द्याया पुन्हा धाड तू वाळवीची कुळे...
गेल्या आठवड्यात कवी ग्रेस यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात ही स्वत:ची कविता ऐकवीत उपस्थितांना सवाल केला की, 'माझ्या कवितेला दुबोर्ध म्हणणारे म्हणोत; पण त्याबद्दल स्पष्टीकरण आणि पुरावे द्यायला मी काय गुन्हेगार आहे?'
' मराठी लोकांचा अंमल सुरू झाला की काय होतं ते बघ. मग तर आपल्याकडे खरोखर गांडूराजच येईल', दिनशॉजी म्हणाला. 'शिवाजी पार्कवर सभा घ्यायच्या, घोषणा द्यायच्या, धमक्या द्यायच्या आणि रस्त्यांची नावं बदलायची, एवढंच त्यांना येतं'. तो अचानक उद्वीगन् झाला. मनातून तो अत्यंत व्यथीत झाला होता. 'कशासाठी नावं बदलायची? साला भेंचोद! हुतात्मा चौक!' तो उद्गारला. 'फ्लोरा फाउंटन काय वाईट होतं?'
हा छोटासा उतारा आहे रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच ए लाँग जनीर्' या कादंबरीतला. ठराविक उताराच या लेखात दिलाय, असा आक्षेप घेतला जाऊ शकतो. पण तसा आक्षेप अंगावर घ्यायचा नसेल, तर अख्खं पुस्तकच छापायला लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे असा आक्षेप हे 'सदर उतारा पुस्तकात आहे', हे सत्य नाकारू शकत नाहीच की.
' मी माझ्या कवितेबद्दल स्पष्टीकरण देणार नाही', असं ग्रेस यांनी सांगून टाकलं. आपल्या पुस्तकाबद्दल मिस्त्री असं काही बोलल्याचं ऐकिवात तरी नाही. ग्रेस यांची कविता दुबोर्ध असल्यानं अभ्यासक्रमातून काढून टाका, गेलाबाजार जाळून तरी टाका, असं कुणी आजवर म्हटलेलं नाही. मिस्त्रींबाबत मात्र तसं झालं. म्हणजे अद्याप तरी त्यांचं पुस्तक जाळलेलं नाही. पण मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीएच्या अभ्यासक्रमातून ते काढून टाकण्यात आलं.
असं एक मानूया की, ग्रेस यांचं एखादं पुस्तक अभ्यासक्रमाला आहे आणि खूपच दुबोर्ध वाटल्यानं ते अभ्यासक्रमातून काढून टाकण्यासाठी कुणीतरी आंदोलन केलं. (दुबोर्धतेच्या मुद्यावर आंदोलन वगैरे करण्याची आपली संस्कृती नाही आणि तसं करण्याची सांस्कृतिक पातळी गाठल्याची काही उदाहरणंही दिसत नाहीत, ते सोडा.) आणि विद्यापीठानं तडकाफडकी ते बादही करून टाकलं. असं झाल्यास काय होईल? ग्रेसप्रेमी म्हणा, वाचक म्हणा, लेखक म्हणा, समीक्षक म्हणा, प्रकाशक म्हणा... कुणीतरी ग्रेसच्या बाजूनं आवाज उठवतील. (अशी आशा बाळगू या.) ग्रेस यांच्या कवितेतील सौंदर्यस्थळं उलगडून दाखवतील. त्यातील दुबोर्धता सुबोध कशी होऊ शकते, याचं विवेचन करतील. किंवा अन्य काहीतरी. एकुणात काय, तर ग्रेसचं पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय चुकीचा कसा, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील.
आता जरा मिस्त्रींकडे वळू या. 'मिस्त्री यांच्या 'सच ए लाँग जनीर्'मध्ये मराठी माणसांबद्दल अनुदार उद्गार आहेत, भाषा अत्यंत गलिच्छ आणि हीन पातळीची आहे' वगैरे आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर हे पुस्तक तडकाफडकी अभ्यासक्रमातून वगळण्यात आलं आणि वादाचा मोठा धुरळा उडाला. याचं एक कारण अगदीच स्पष्ट होतं. ज्यांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला, ती शिवसेना (पुढे कुणालाही केलेलं असो.) आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्यात काय नातं आहे, हे सर्वश्रुतच आहे. शिवाय, शिवसेनेच्या 'युवराजां'साठी या प्रकरणाचा उपयोग लाँचिंग पॅड म्हणून करण्यात येत असल्याचा आक्षेप होताच. त्यात तथ्यही होतं. मग सुरू झाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा, लेखनस्वातंत्र्याचा जयघोष. पुस्तकाला विरोध करणाऱ्यांपैकी कितीजणांनी हे पुस्तक खरोखरच वाचलं आहे, या प्रश्नाचं हत्यार उपसलं गेलं. कारण आंधळ्या झुंडशाहीच्या राजकारणातील बहुतांश मंडळी असलं वाचन बिचन करण्याच्या भानगडीत फारशी पडत नाहीत, हे सदर हत्यार उपसणाऱ्यांना आणि खरं तर सगळ्यांनाच चांगलं ठाऊक. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर झुंडीतील कुणाहीसाठी फारसं सोयीचं नव्हतंच. आता असल्या प्रश्नांचं उत्तर देण्याची पत्रासही ते बाळगत नाहीत, हा मुद्दा निराळा. पण प्रश्नर्कत्यांना तेवढंच नैतिक आणि आत्मिक समाधान स्वत:च्या विजयाचं.
आता या विजयाचं सेलिब्रेशन करायचं तर करू देत त्यांना, पण याच निमित्तानं एक दुसरा सवाल उभा राहिला आहे तो अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी उभं राहणाऱ्यांच्या जागरुकतेचा. लेखक व त्याचं लेखन हे स्वयंभू आणि सार्वभौम असतं हे अगदी मान्य. आणि त्याबाबत लढाई झाल्यास स्वातंत्र्याच्या बाजूनं उभं राहण्यातही काही गैर नाही. मुद्दा येतो तो आपण स्वातंत्र्यासाठी का उभे आहोत, याचं स्पष्टीकरण करण्याचा. आणि हे स्पष्टीकरण केवळ तात्त्विक अर्थाचं, तात्त्विक पातळीवरील नव्हे. लेखनस्वातंत्र्याचा सबगोलंकार जयघोष येथे अपेक्षित नाही. इथे अपेक्षित आहे तो तपशील. 'सच ए लाँग जनीर्'च्या निमित्तानं झालेल्या वादात लेखनस्वातंत्र्याच्या बाजूनं उभं राहिलेल्या मंडळींकडून असा तपशील आलेला बघण्यात नाही. या कादंबरीवर जे आक्षेप घेण्यात आले, ते खोडून काढण्यासाठी या मंडळींनी काही ठोस तपशिलातील उत्तरं दिली आहेत का? थेट उदाहरणंच पाहू. मराठी माणूस ही एक 'कम्युनिटी' असं गणित मांडून त्यावर शेरेबाजी आहे, एका पात्राच्या तोंडी मुंबईतील डबेवाल्यांविषयी 'वगीर्य' उद्गार आहेत, एक पुरुषपात्र 'पलंगतोड' पान खाऊन जे काही करतो, त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. कॉलेज अभ्यासक्रमात लावण्यात येणाऱ्या कादंबरीत हे घटक चालू शकतात, असं अभिव्यक्तीवाल्यांचं म्हणणं असेल, तर त्यांनी ते नीट मांडावं. कादंबरीवरील आक्षेपांचं मुद्देसूद उत्तर द्यावं. (ते देता आलं नाही, तर 'यांनी तरी पुस्तक कुठे वाचलं आहे?', अशा प्रश्नाचं हत्यार पहिल्या झुंडीतल्या लोकांनी उगारलं तर?) ही आपली जबाबदारी आहे, असं या मंडळींना वाटत नाही का? त्यासाठी केवळ आविष्कारस्वातंत्र्याची ढाल पुढे करून कसं चालेल? तसं असेल तर मग हीदेखील एक आंधळी झुंडशाहीच झाली. आविष्कारस्वातंत्र्य म्हणजे आविष्कारस्वातंत्र्य, त्यापुढे कुणी बोलता कामा नये, असा दुटप्पी व्यवहार कसा चालेल? एक शक्यता अशी की, तसा व्यवहार न केल्यास आपल्यावर 'पहिल्या झुंडीतला' असा शिक्का बसेल आणि आपण प्रतिगामी ठरू, ही मनातील भीती. ही भीती बाळगण्यामागील कारण तात्त्विक नव्हे, तर बहुतांशी व्यावहारिक. त्यामागे कुठले कुठले हिशेब मांडलेले. म्हणजे संपलंच सगळं.
या असल्या आंधळ्या झुंडींच्या झोंबीतून काय साध्य करणार आहोत आपण? पहिली झुंड इतका सारासार विचार करणार नाही, अशी दुसऱ्या झुंडीची धारणा असेल, तर मग त्यांनी तरी तो नीट करावा. आणि डोळे उघडून करावा. ही ग्रेसची खूप आतली दुबोर्ध कविता नाही. हे अटळ, क्लिष्ट तरीही सुबोध वास्तव आहे. समजण्यासारखं. पान उलटून ते बाजूला करता येणार नाही.
कॉलेज अभ्यासक्रमात लावण्यात येणा-या कादंबरीत हे घटक चालू शकतात, असं अभिव्यक्तीवाल्यांचं म्हणणं असेल, तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं. कादंबरीवरील प्रत्येक आक्षेपाचं मुद्देसूद उत्तर द्यावं. त्यासाठी केवळ आविष्कारस्वातंत्र्याची ढाल पुढे करून कसं चालेल? तसं असेल तर मग हीदेखील एक आंधळी झुंडशाहीच झाली. आविष्कारस्वातंत्र्य म्हणजे आविष्कारस्वातंत्र्य, त्यापुढे कुणी बोलता कामा नये, असा दुटप्पी व्यवहार कसा चालेल?
..................
कवितेत अर्थांतरन्यास जेव्हा प्रभूच्या दयेतूनही कोसळे,
या संहितेला नवे शील द्याया पुन्हा धाड तू वाळवीची कुळे...
गेल्या आठवड्यात कवी ग्रेस यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात ही स्वत:ची कविता ऐकवीत उपस्थितांना सवाल केला की, 'माझ्या कवितेला दुबोर्ध म्हणणारे म्हणोत; पण त्याबद्दल स्पष्टीकरण आणि पुरावे द्यायला मी काय गुन्हेगार आहे?'
' मराठी लोकांचा अंमल सुरू झाला की काय होतं ते बघ. मग तर आपल्याकडे खरोखर गांडूराजच येईल', दिनशॉजी म्हणाला. 'शिवाजी पार्कवर सभा घ्यायच्या, घोषणा द्यायच्या, धमक्या द्यायच्या आणि रस्त्यांची नावं बदलायची, एवढंच त्यांना येतं'. तो अचानक उद्वीगन् झाला. मनातून तो अत्यंत व्यथीत झाला होता. 'कशासाठी नावं बदलायची? साला भेंचोद! हुतात्मा चौक!' तो उद्गारला. 'फ्लोरा फाउंटन काय वाईट होतं?'
हा छोटासा उतारा आहे रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच ए लाँग जनीर्' या कादंबरीतला. ठराविक उताराच या लेखात दिलाय, असा आक्षेप घेतला जाऊ शकतो. पण तसा आक्षेप अंगावर घ्यायचा नसेल, तर अख्खं पुस्तकच छापायला लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे असा आक्षेप हे 'सदर उतारा पुस्तकात आहे', हे सत्य नाकारू शकत नाहीच की.
' मी माझ्या कवितेबद्दल स्पष्टीकरण देणार नाही', असं ग्रेस यांनी सांगून टाकलं. आपल्या पुस्तकाबद्दल मिस्त्री असं काही बोलल्याचं ऐकिवात तरी नाही. ग्रेस यांची कविता दुबोर्ध असल्यानं अभ्यासक्रमातून काढून टाका, गेलाबाजार जाळून तरी टाका, असं कुणी आजवर म्हटलेलं नाही. मिस्त्रींबाबत मात्र तसं झालं. म्हणजे अद्याप तरी त्यांचं पुस्तक जाळलेलं नाही. पण मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीएच्या अभ्यासक्रमातून ते काढून टाकण्यात आलं.
असं एक मानूया की, ग्रेस यांचं एखादं पुस्तक अभ्यासक्रमाला आहे आणि खूपच दुबोर्ध वाटल्यानं ते अभ्यासक्रमातून काढून टाकण्यासाठी कुणीतरी आंदोलन केलं. (दुबोर्धतेच्या मुद्यावर आंदोलन वगैरे करण्याची आपली संस्कृती नाही आणि तसं करण्याची सांस्कृतिक पातळी गाठल्याची काही उदाहरणंही दिसत नाहीत, ते सोडा.) आणि विद्यापीठानं तडकाफडकी ते बादही करून टाकलं. असं झाल्यास काय होईल? ग्रेसप्रेमी म्हणा, वाचक म्हणा, लेखक म्हणा, समीक्षक म्हणा, प्रकाशक म्हणा... कुणीतरी ग्रेसच्या बाजूनं आवाज उठवतील. (अशी आशा बाळगू या.) ग्रेस यांच्या कवितेतील सौंदर्यस्थळं उलगडून दाखवतील. त्यातील दुबोर्धता सुबोध कशी होऊ शकते, याचं विवेचन करतील. किंवा अन्य काहीतरी. एकुणात काय, तर ग्रेसचं पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय चुकीचा कसा, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील.
आता जरा मिस्त्रींकडे वळू या. 'मिस्त्री यांच्या 'सच ए लाँग जनीर्'मध्ये मराठी माणसांबद्दल अनुदार उद्गार आहेत, भाषा अत्यंत गलिच्छ आणि हीन पातळीची आहे' वगैरे आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर हे पुस्तक तडकाफडकी अभ्यासक्रमातून वगळण्यात आलं आणि वादाचा मोठा धुरळा उडाला. याचं एक कारण अगदीच स्पष्ट होतं. ज्यांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला, ती शिवसेना (पुढे कुणालाही केलेलं असो.) आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्यात काय नातं आहे, हे सर्वश्रुतच आहे. शिवाय, शिवसेनेच्या 'युवराजां'साठी या प्रकरणाचा उपयोग लाँचिंग पॅड म्हणून करण्यात येत असल्याचा आक्षेप होताच. त्यात तथ्यही होतं. मग सुरू झाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा, लेखनस्वातंत्र्याचा जयघोष. पुस्तकाला विरोध करणाऱ्यांपैकी कितीजणांनी हे पुस्तक खरोखरच वाचलं आहे, या प्रश्नाचं हत्यार उपसलं गेलं. कारण आंधळ्या झुंडशाहीच्या राजकारणातील बहुतांश मंडळी असलं वाचन बिचन करण्याच्या भानगडीत फारशी पडत नाहीत, हे सदर हत्यार उपसणाऱ्यांना आणि खरं तर सगळ्यांनाच चांगलं ठाऊक. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर झुंडीतील कुणाहीसाठी फारसं सोयीचं नव्हतंच. आता असल्या प्रश्नांचं उत्तर देण्याची पत्रासही ते बाळगत नाहीत, हा मुद्दा निराळा. पण प्रश्नर्कत्यांना तेवढंच नैतिक आणि आत्मिक समाधान स्वत:च्या विजयाचं.
आता या विजयाचं सेलिब्रेशन करायचं तर करू देत त्यांना, पण याच निमित्तानं एक दुसरा सवाल उभा राहिला आहे तो अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी उभं राहणाऱ्यांच्या जागरुकतेचा. लेखक व त्याचं लेखन हे स्वयंभू आणि सार्वभौम असतं हे अगदी मान्य. आणि त्याबाबत लढाई झाल्यास स्वातंत्र्याच्या बाजूनं उभं राहण्यातही काही गैर नाही. मुद्दा येतो तो आपण स्वातंत्र्यासाठी का उभे आहोत, याचं स्पष्टीकरण करण्याचा. आणि हे स्पष्टीकरण केवळ तात्त्विक अर्थाचं, तात्त्विक पातळीवरील नव्हे. लेखनस्वातंत्र्याचा सबगोलंकार जयघोष येथे अपेक्षित नाही. इथे अपेक्षित आहे तो तपशील. 'सच ए लाँग जनीर्'च्या निमित्तानं झालेल्या वादात लेखनस्वातंत्र्याच्या बाजूनं उभं राहिलेल्या मंडळींकडून असा तपशील आलेला बघण्यात नाही. या कादंबरीवर जे आक्षेप घेण्यात आले, ते खोडून काढण्यासाठी या मंडळींनी काही ठोस तपशिलातील उत्तरं दिली आहेत का? थेट उदाहरणंच पाहू. मराठी माणूस ही एक 'कम्युनिटी' असं गणित मांडून त्यावर शेरेबाजी आहे, एका पात्राच्या तोंडी मुंबईतील डबेवाल्यांविषयी 'वगीर्य' उद्गार आहेत, एक पुरुषपात्र 'पलंगतोड' पान खाऊन जे काही करतो, त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. कॉलेज अभ्यासक्रमात लावण्यात येणाऱ्या कादंबरीत हे घटक चालू शकतात, असं अभिव्यक्तीवाल्यांचं म्हणणं असेल, तर त्यांनी ते नीट मांडावं. कादंबरीवरील आक्षेपांचं मुद्देसूद उत्तर द्यावं. (ते देता आलं नाही, तर 'यांनी तरी पुस्तक कुठे वाचलं आहे?', अशा प्रश्नाचं हत्यार पहिल्या झुंडीतल्या लोकांनी उगारलं तर?) ही आपली जबाबदारी आहे, असं या मंडळींना वाटत नाही का? त्यासाठी केवळ आविष्कारस्वातंत्र्याची ढाल पुढे करून कसं चालेल? तसं असेल तर मग हीदेखील एक आंधळी झुंडशाहीच झाली. आविष्कारस्वातंत्र्य म्हणजे आविष्कारस्वातंत्र्य, त्यापुढे कुणी बोलता कामा नये, असा दुटप्पी व्यवहार कसा चालेल? एक शक्यता अशी की, तसा व्यवहार न केल्यास आपल्यावर 'पहिल्या झुंडीतला' असा शिक्का बसेल आणि आपण प्रतिगामी ठरू, ही मनातील भीती. ही भीती बाळगण्यामागील कारण तात्त्विक नव्हे, तर बहुतांशी व्यावहारिक. त्यामागे कुठले कुठले हिशेब मांडलेले. म्हणजे संपलंच सगळं.
या असल्या आंधळ्या झुंडींच्या झोंबीतून काय साध्य करणार आहोत आपण? पहिली झुंड इतका सारासार विचार करणार नाही, अशी दुसऱ्या झुंडीची धारणा असेल, तर मग त्यांनी तरी तो नीट करावा. आणि डोळे उघडून करावा. ही ग्रेसची खूप आतली दुबोर्ध कविता नाही. हे अटळ, क्लिष्ट तरीही सुबोध वास्तव आहे. समजण्यासारखं. पान उलटून ते बाजूला करता येणार नाही.
0 comments:
Post a Comment