अनुभवांचे गणित मांडताना
बेरीज करायची की वजावाकी, गुणाकार करायचा की भागाकार हा ज्याचा त्याचा
व्यक्तिगत प्रश्न. पण ही व्यक्ती जर लेखक किंवा कवी असेल तर हा व्यक्तिगत
प्रश्न न सोडवताच बेफिकीरीने पान उलटून पुढे जाणे अंमळ कठीणच. कारण येथे
मागणी बेरजेची आणि गुणाकाराची. अत्यावश्यक तेथे वजाबाकी व भागाकार हवा, हे
मान्य. पण मुळात हाताला वळण हवे ते अधिकाचेच चिन्ह गिरवण्याचे.
..............
निमित्त... ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सच्या 'शांताराम' या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध होणे.
लेखक किंवा कवी जे काही लिहितो तो पक्का माल धरला तर त्याच्याकडील कच्चा माल कुठला? प्रज्ञा, शब्दप्रतिभा, शब्दसंग्रह, ते जुळवण्याची हातोटी, प्रकटीकरणाचे सार्मथ्य हे तर आलेच; पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवांचे संचित. अनुभव ग्रहण करण्याचे बळ. अनुभवांना धीटपणे, थेटपणे सामोरे जाण्याची ताकद. अनुभव ही 'येण्या'ची गोष्ट आहेच, पण त्याहीपेक्षा ती गोष्ट आहे 'जाणवण्या'ची. त्यासाठी शरीराची पंचेदिये जागी असावी लागतात, जागी ठेवावी लागतात. मन, संवेदना जित्याजागत्या आणि खुल्याही ठेवाव्या लागतात.
ही अवस्था कुठली?
थोडा संदर्भ आणि शब्दपालट मंजूर केला तर, 'मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे' अशी ही स्थिती. या लेखास निमित्तमात्र असलेल्या 'शांताराम'ची अवस्था ही अशी असावी.
शांतारामसारखी प्रज्ञा आपल्याकडे नाही का? त्याच्यासारखी शब्दप्रतिभा आपल्याकडे नाही का? शब्द जुळवण्याची हातोटी आपल्याकडे नाही का? प्रकटीकरणाचे सार्मथ्य आपल्याकडील लेखक-कवीमध्ये नाही का?
तर या प्रश्नांची उत्तरे 'आहे' असे मिळणे त्यातील अनेकांबाबत शक्य आहे.
प्रश्न उरतो तो अनुभव ग्रहण करण्याच्या ताकदीचा.
आता अनुभव अनेकदा परिस्थितीजन्य असतात हे खरे. या परिस्थितीत बरेच काही येते. आथिर्क, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, शैक्षणिक, मानसिक, नैतिक, शारीरिक, समूहमानस... अशा असंख्य गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे परिस्थिती. म्हणजे अनुभवांचे गणित या गोळाबेरजेवर ठरणार, हे नक्की. अनुभवांचे हे गणित मांडताना बेरीज करायची की वजावाकी, गुणाकार करायचा की भागाकार हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न. पण ही व्यक्ती जर लेखक किंवा कवी असेल, तर हा व्यक्तिगत प्रश्न न सोडवताच बेफिकिरीने पान उलटून पुढे जाणे अंमळ कठीणच. कारण येथे मागणी बेरजेची आणि गुणाकाराची. अत्यावश्यक तेथे वजाबाकी व भागाकार हवा, हे मान्य. पण मुळात हाताला वळण हवे ते अधिकाचेच चिन्ह गिरवण्याचे.
ते वळण शांतारामच्या हाताला दिसते. येथील मंडळींच्या हाताला ते आहे काय?
या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे फारच थोड्या मंडळींबाबत शक्य.
शांताराम आणि येथील मंडळी यांच्यात ही तुलना होत आहे काय? शक्य आहे. आता हे खरे की, शांतारामचे अनुभवविश्व येथील मंडळींपेक्षा कितीतरी वेगळे. त्याची मनोभूमी येथील मंडळींच्या मनोभूमीपेक्षा निश्चितच निराळी. आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन येथील मंडळींपेक्षा भिन्न. त्याची आयुष्यशैली येथील लोकांपेक्षा अलग. या सगळ्यामुळे तो जे काही लिहिणार ते येथील मंडळींपेक्षा वेगळेच असणार. पण हे तर असणारच. किंबहुना असेच असायला हवे. सगळ्यांचेच शब्द एकसाच्यातील कसे चालतील?
मूळ मुद्दा आहे तो स्वत:च्या मनास कुंपण घालण्याचा. कुंपण घालून आतल्या घरात बसून राहणे सोपे आणि सुरक्षेचे. त्याने हातचे आहे ते राखले जाईल कदाचित. अनेक कुंपणवाल्यांनी एकत्र येऊन बेतलेल्या गणिताचे उत्तर पुरस्कारांच्या वा कुठल्यातरी गौरवांच्या स्वरूपात मिळत राहीलही कदाचित. मानाचे दशांश चिन्हही मिरवायला मिळेल कदाचित. पण हाती राखलेल्यात काही भर टाकायची असेल तर कुंपण घालून चालणार कसे? असलेले कुंपण तोडून भिरकावून द्यायला हवे.
आता कुंपण भिरकावयाचे म्हणजे लगेच कृतक-कलंदरासारखे वागायचे असे नाही. त्यातून खरे, अस्सल काही हाती लागणे कठीणच. शिवाय ती फार मोठी आत्मवंचनाही. त्यामुळे त्याच्या वाटेस न गेलेलेच उत्तम. बेभानाचेही भान राखत, भोवतीच्या समष्टीचा सहवेदनेने अदमास घेत, संवेदनशीलतेला धार लावून जगणे म्हणजे कुंपण तोडणे. आणि असे जगल्यास ती लिपी शब्दांत उमटणारच. कारण शब्दांतून उमटणारी लिपी कुठल्या परग्रहावरच्या अनुभवांची नसते, ती इथल्या, या जमिनीतल्या अनुभवांची असते.
जमीन समोर अमोज पसरली आहे. सरळवाकड्या, सुखदु:खाच्या, नीतीअनीतीच्या, वास्तवआभासाच्या, निराशाचैतन्याच्या असंख्य अनुभवांची बिजे त्यात रुजलेली आहेत. कुंपण तुटू दे... ती हिरवी सरसरून वर येणारच.
राजीव काळे
..............
निमित्त... ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सच्या 'शांताराम' या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध होणे.
लेखक किंवा कवी जे काही लिहितो तो पक्का माल धरला तर त्याच्याकडील कच्चा माल कुठला? प्रज्ञा, शब्दप्रतिभा, शब्दसंग्रह, ते जुळवण्याची हातोटी, प्रकटीकरणाचे सार्मथ्य हे तर आलेच; पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवांचे संचित. अनुभव ग्रहण करण्याचे बळ. अनुभवांना धीटपणे, थेटपणे सामोरे जाण्याची ताकद. अनुभव ही 'येण्या'ची गोष्ट आहेच, पण त्याहीपेक्षा ती गोष्ट आहे 'जाणवण्या'ची. त्यासाठी शरीराची पंचेदिये जागी असावी लागतात, जागी ठेवावी लागतात. मन, संवेदना जित्याजागत्या आणि खुल्याही ठेवाव्या लागतात.
ही अवस्था कुठली?
थोडा संदर्भ आणि शब्दपालट मंजूर केला तर, 'मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे' अशी ही स्थिती. या लेखास निमित्तमात्र असलेल्या 'शांताराम'ची अवस्था ही अशी असावी.
शांतारामसारखी प्रज्ञा आपल्याकडे नाही का? त्याच्यासारखी शब्दप्रतिभा आपल्याकडे नाही का? शब्द जुळवण्याची हातोटी आपल्याकडे नाही का? प्रकटीकरणाचे सार्मथ्य आपल्याकडील लेखक-कवीमध्ये नाही का?
तर या प्रश्नांची उत्तरे 'आहे' असे मिळणे त्यातील अनेकांबाबत शक्य आहे.
प्रश्न उरतो तो अनुभव ग्रहण करण्याच्या ताकदीचा.
आता अनुभव अनेकदा परिस्थितीजन्य असतात हे खरे. या परिस्थितीत बरेच काही येते. आथिर्क, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, शैक्षणिक, मानसिक, नैतिक, शारीरिक, समूहमानस... अशा असंख्य गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे परिस्थिती. म्हणजे अनुभवांचे गणित या गोळाबेरजेवर ठरणार, हे नक्की. अनुभवांचे हे गणित मांडताना बेरीज करायची की वजावाकी, गुणाकार करायचा की भागाकार हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न. पण ही व्यक्ती जर लेखक किंवा कवी असेल, तर हा व्यक्तिगत प्रश्न न सोडवताच बेफिकिरीने पान उलटून पुढे जाणे अंमळ कठीणच. कारण येथे मागणी बेरजेची आणि गुणाकाराची. अत्यावश्यक तेथे वजाबाकी व भागाकार हवा, हे मान्य. पण मुळात हाताला वळण हवे ते अधिकाचेच चिन्ह गिरवण्याचे.
ते वळण शांतारामच्या हाताला दिसते. येथील मंडळींच्या हाताला ते आहे काय?
या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे फारच थोड्या मंडळींबाबत शक्य.
शांताराम आणि येथील मंडळी यांच्यात ही तुलना होत आहे काय? शक्य आहे. आता हे खरे की, शांतारामचे अनुभवविश्व येथील मंडळींपेक्षा कितीतरी वेगळे. त्याची मनोभूमी येथील मंडळींच्या मनोभूमीपेक्षा निश्चितच निराळी. आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन येथील मंडळींपेक्षा भिन्न. त्याची आयुष्यशैली येथील लोकांपेक्षा अलग. या सगळ्यामुळे तो जे काही लिहिणार ते येथील मंडळींपेक्षा वेगळेच असणार. पण हे तर असणारच. किंबहुना असेच असायला हवे. सगळ्यांचेच शब्द एकसाच्यातील कसे चालतील?
मूळ मुद्दा आहे तो स्वत:च्या मनास कुंपण घालण्याचा. कुंपण घालून आतल्या घरात बसून राहणे सोपे आणि सुरक्षेचे. त्याने हातचे आहे ते राखले जाईल कदाचित. अनेक कुंपणवाल्यांनी एकत्र येऊन बेतलेल्या गणिताचे उत्तर पुरस्कारांच्या वा कुठल्यातरी गौरवांच्या स्वरूपात मिळत राहीलही कदाचित. मानाचे दशांश चिन्हही मिरवायला मिळेल कदाचित. पण हाती राखलेल्यात काही भर टाकायची असेल तर कुंपण घालून चालणार कसे? असलेले कुंपण तोडून भिरकावून द्यायला हवे.
आता कुंपण भिरकावयाचे म्हणजे लगेच कृतक-कलंदरासारखे वागायचे असे नाही. त्यातून खरे, अस्सल काही हाती लागणे कठीणच. शिवाय ती फार मोठी आत्मवंचनाही. त्यामुळे त्याच्या वाटेस न गेलेलेच उत्तम. बेभानाचेही भान राखत, भोवतीच्या समष्टीचा सहवेदनेने अदमास घेत, संवेदनशीलतेला धार लावून जगणे म्हणजे कुंपण तोडणे. आणि असे जगल्यास ती लिपी शब्दांत उमटणारच. कारण शब्दांतून उमटणारी लिपी कुठल्या परग्रहावरच्या अनुभवांची नसते, ती इथल्या, या जमिनीतल्या अनुभवांची असते.
जमीन समोर अमोज पसरली आहे. सरळवाकड्या, सुखदु:खाच्या, नीतीअनीतीच्या, वास्तवआभासाच्या, निराशाचैतन्याच्या असंख्य अनुभवांची बिजे त्यात रुजलेली आहेत. कुंपण तुटू दे... ती हिरवी सरसरून वर येणारच.
राजीव काळे
0 comments:
Post a Comment