- राजीव काळे
एका आवर्तनात अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनास अधिकाधिक व्यापक स्वरूप प्राप्त होण्याच्या मार्गावरील हे छोटेसे पाऊल ठरू शकते, असा आशावाद बाळगण्यास तरी हरकत नाही. हा आशावाद खरा ठरवायचा असेल तर यापुढील संमेलनांतही अशा प्रकारची पावले टाकायला हवीत.
....................
आणखी बरोबर दोन आठवड्यांनी ठाण्यातील ८४व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'साठीची आयोजकांची लगबग कमालीची वाढलेली असेल. मंडप उभारणीपासून ते जेवणा-खाण्याच्या व्यवस्थेपर्यंत... सगळ्याच गोष्टींच्या तयारीवर अखेरचा हात फिरवला जात असेल. त्यावेळी आयोजकांच्या मनात उत्साह असेल तशीच थोडी धाकधूकही. धाकधूक कसली? 'एवढा घाट घातलाय आपण, तर संमेलन नीट पार पडेल ना', याची.
... आणि आणखी बरोबर तीन आठवड्यांनी संमेलनाचा मंडप उतरेल. आयोजक शिणवटा दूर करीत असतील. संमेलनास प्रत्यक्ष उपस्थिती लावणारे, त्याच्या बातम्या वृत्तपत्रांत आस्थेने वाचणारे, टीव्हीवर पाहणारे त्यावेळी काय करत असतील? मनावर चढलेला संमेलनाचा रंग थोडा बाळगत, थोडा पुसत आपापल्या कामाला लागले असतील. हा बाळगायचा आणि पुसायचा रंग कसा असेल? हवाहवासा की नकोनकोसा? पुढच्या दोन आठवड्यांत आणि नंतर प्रत्यक्ष संमेलनात नेमके काय घडते, यावर हा रंग विसंबून असेल.
आता साहित्य संमेलनाच्या आधीच्या दिवसांत आणि प्रत्यक्ष साहित्य संमेलनात काय घडायला हवे, या प्रश्नाचे उत्तर उघडच आहे. संमेलन मराठी साहित्याचे असल्याने मराठी भाषा व साहित्याविषयीची साधकबाधक चर्चा. अशी चर्चा यावेळी होईल? संमेलनांच्या गतानुभवांचा वेताळ मानगुटीवर इतका घट्ट बसलेला आहे, की या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे देण्यास जीभ रेटली तर नवलच. आणि गतानुभव कशाला? या ठाणे संमेलनाच्याही काही घटना आणि अनुभव तसे आहेतच की. आयोजकांमधील कुरबुरी, आरोप-प्रत्यारोप, उद्घाटकाचा वाद, खर्चाच्या रकमेवरील आक्षेप या तर ठळकपणे समोर आलेल्या गोष्टी. अद्याप समोर न आलेल्या किंवा न आणलेल्या आणखी बऱ्याच गोष्टी आहेतच. पण या नकोशा रंगांआडून एक हवासा लोभस रंग डोकावतो आहे. त्याची दखल घ्यायलाच हवी.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि स्थानिक यजमान संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांतून वर्षानुवषेर् अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने पार पडत आहेत. अध्यक्षीय निवडणुकीच्या संकुचित रीतीवर होणारी टीका बाजूला ठेवली तरी या संमेलनांनी 'अखिल भारतीय' असे बिरूद लावण्याचे धारिष्ट्य का करावे, हा अनेकदा, किंबहुना नेहमीच पडणारा प्रश्न. ठराविक प्रदेशापुरती, ठराविक घटकांपुरती, ठराविक मंडळींपुरती, ठराविक कार्यक्रमांपुरती संमेलनांची चाकोरी ठरलेली. त्या चाकोरीतून चालताना हमखास गदीर्ची खात्री मिळत असेलही संबंधितांना; पण मराठीचे, मराठी साहित्याचे काही भले होईल, त्याच्या गुणात्मक आणि भौमितिक विकासास चालना मिळेलच, याची खात्री बाळगणे कठीण.
ठाण्यातील चित्र थोडे वेगळे दिसते आहे.
संमेलनाची रूढ चाकोरी पार तोडूनमोडून थेट क्रांतीबिंती झालेली नाही ठाण्यात. पण संमेलनाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेले साहित्य कार्यक्रम व त्यांना मिळालेला प्रतिसाद आवर्जून लक्षात घ्यावा, असा आहे. सातपाटीत झालेले कोळीबांधव संमेलन तसेच जव्हारचे आदिवासी संमेलन हे दोन्ही कार्यक्रम खास ध्यानात घ्यावेत असेच. मुंबई-पुण्यातील मराठीजन बोलतात किंवा लिहितात किंवा छापतात ती मराठी भाषा आहेच, पण केवळ तीच मराठी भाषा नाही. तसल्या गैरसमजात कुणी राहू नये. या भाषेच्या वर्तुळाबाहेरही अतिशय समृद्ध वारसा असलेली आपल्याच मराठीची विविधरंगी रूपे आहेत. स्थानिक मातीचा रंग आणि गंध त्यांना आहे. ही रूपे उपेक्षित ठेवून कसे चालणार? तसे केल्याने त्यांचे काय नुकसान होईल, यापेक्षा मराठीचे काय नुकसान होईल, याचा विचार महत्त्वाचा. ठाण्यातील संमेलनाच्या निमित्ताने तो झाला असावा, असे दिसते. त्याखेरीज महानुभाव साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, शालेय विद्याथीर् संमेलन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संमेलन असे कार्यक्रम येत्या काही दिवसांत होतील. एका आवर्तनात अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनास अधिकाधिक व्यापक स्वरूप देण्याच्या मार्गावरील हे छोटेसे पाऊल ठरू शकते. अर्थात, हा आशावाद खरा ठरवायचा असेल तर यापुढील संमेलनांतही अशा प्रकारची पावले टाकायला हवीत.
आता यातही एक भीती आहेच. म्हणजे मुख्य साहित्य संमेलनाआधी घेतले एखादे आदिवासी संमेलन, घेतले एखादे महिला संमेलन की मग या घटकांना मुख्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान द्यायलाच नको... तिथे आपली आणि आपल्या पिट्ट्यांचीच घोडी नाचवायची, असला बेरकी हिशेब तसलीच बेरकी मंडळी करू शकतात. आणि भोळसट, भाबडी मंडळी त्यास भुलू शकतात. तसे होता कामा नये. या घटकांना मुख्य संमेलनाच्या व्यासपीठावरही स्थान मिळालेच पाहिजे. आणि तेही त्यांच्यावरील उपकार म्हणून नव्हे, तर तो त्यांचा हक्क आहे, म्हणून.
ठाणे संमेलनाच्या उद्घाटकपदाची खुचीर् रिकामी आहे. त्यामुळे महामंडळाचा ध्वज फडकावून संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्या ध्वजाच्या सोबतीला काही नवे-वेगळे (भले त्याचा आवाका कमी असेल) आकाशात फडकू पहात आहे. त्याचे स्वागत करायला हवे!
एका आवर्तनात अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनास अधिकाधिक व्यापक स्वरूप प्राप्त होण्याच्या मार्गावरील हे छोटेसे पाऊल ठरू शकते, असा आशावाद बाळगण्यास तरी हरकत नाही. हा आशावाद खरा ठरवायचा असेल तर यापुढील संमेलनांतही अशा प्रकारची पावले टाकायला हवीत.
....................
आणखी बरोबर दोन आठवड्यांनी ठाण्यातील ८४व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'साठीची आयोजकांची लगबग कमालीची वाढलेली असेल. मंडप उभारणीपासून ते जेवणा-खाण्याच्या व्यवस्थेपर्यंत... सगळ्याच गोष्टींच्या तयारीवर अखेरचा हात फिरवला जात असेल. त्यावेळी आयोजकांच्या मनात उत्साह असेल तशीच थोडी धाकधूकही. धाकधूक कसली? 'एवढा घाट घातलाय आपण, तर संमेलन नीट पार पडेल ना', याची.
... आणि आणखी बरोबर तीन आठवड्यांनी संमेलनाचा मंडप उतरेल. आयोजक शिणवटा दूर करीत असतील. संमेलनास प्रत्यक्ष उपस्थिती लावणारे, त्याच्या बातम्या वृत्तपत्रांत आस्थेने वाचणारे, टीव्हीवर पाहणारे त्यावेळी काय करत असतील? मनावर चढलेला संमेलनाचा रंग थोडा बाळगत, थोडा पुसत आपापल्या कामाला लागले असतील. हा बाळगायचा आणि पुसायचा रंग कसा असेल? हवाहवासा की नकोनकोसा? पुढच्या दोन आठवड्यांत आणि नंतर प्रत्यक्ष संमेलनात नेमके काय घडते, यावर हा रंग विसंबून असेल.
आता साहित्य संमेलनाच्या आधीच्या दिवसांत आणि प्रत्यक्ष साहित्य संमेलनात काय घडायला हवे, या प्रश्नाचे उत्तर उघडच आहे. संमेलन मराठी साहित्याचे असल्याने मराठी भाषा व साहित्याविषयीची साधकबाधक चर्चा. अशी चर्चा यावेळी होईल? संमेलनांच्या गतानुभवांचा वेताळ मानगुटीवर इतका घट्ट बसलेला आहे, की या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे देण्यास जीभ रेटली तर नवलच. आणि गतानुभव कशाला? या ठाणे संमेलनाच्याही काही घटना आणि अनुभव तसे आहेतच की. आयोजकांमधील कुरबुरी, आरोप-प्रत्यारोप, उद्घाटकाचा वाद, खर्चाच्या रकमेवरील आक्षेप या तर ठळकपणे समोर आलेल्या गोष्टी. अद्याप समोर न आलेल्या किंवा न आणलेल्या आणखी बऱ्याच गोष्टी आहेतच. पण या नकोशा रंगांआडून एक हवासा लोभस रंग डोकावतो आहे. त्याची दखल घ्यायलाच हवी.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि स्थानिक यजमान संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांतून वर्षानुवषेर् अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने पार पडत आहेत. अध्यक्षीय निवडणुकीच्या संकुचित रीतीवर होणारी टीका बाजूला ठेवली तरी या संमेलनांनी 'अखिल भारतीय' असे बिरूद लावण्याचे धारिष्ट्य का करावे, हा अनेकदा, किंबहुना नेहमीच पडणारा प्रश्न. ठराविक प्रदेशापुरती, ठराविक घटकांपुरती, ठराविक मंडळींपुरती, ठराविक कार्यक्रमांपुरती संमेलनांची चाकोरी ठरलेली. त्या चाकोरीतून चालताना हमखास गदीर्ची खात्री मिळत असेलही संबंधितांना; पण मराठीचे, मराठी साहित्याचे काही भले होईल, त्याच्या गुणात्मक आणि भौमितिक विकासास चालना मिळेलच, याची खात्री बाळगणे कठीण.
ठाण्यातील चित्र थोडे वेगळे दिसते आहे.
संमेलनाची रूढ चाकोरी पार तोडूनमोडून थेट क्रांतीबिंती झालेली नाही ठाण्यात. पण संमेलनाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेले साहित्य कार्यक्रम व त्यांना मिळालेला प्रतिसाद आवर्जून लक्षात घ्यावा, असा आहे. सातपाटीत झालेले कोळीबांधव संमेलन तसेच जव्हारचे आदिवासी संमेलन हे दोन्ही कार्यक्रम खास ध्यानात घ्यावेत असेच. मुंबई-पुण्यातील मराठीजन बोलतात किंवा लिहितात किंवा छापतात ती मराठी भाषा आहेच, पण केवळ तीच मराठी भाषा नाही. तसल्या गैरसमजात कुणी राहू नये. या भाषेच्या वर्तुळाबाहेरही अतिशय समृद्ध वारसा असलेली आपल्याच मराठीची विविधरंगी रूपे आहेत. स्थानिक मातीचा रंग आणि गंध त्यांना आहे. ही रूपे उपेक्षित ठेवून कसे चालणार? तसे केल्याने त्यांचे काय नुकसान होईल, यापेक्षा मराठीचे काय नुकसान होईल, याचा विचार महत्त्वाचा. ठाण्यातील संमेलनाच्या निमित्ताने तो झाला असावा, असे दिसते. त्याखेरीज महानुभाव साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, शालेय विद्याथीर् संमेलन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संमेलन असे कार्यक्रम येत्या काही दिवसांत होतील. एका आवर्तनात अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनास अधिकाधिक व्यापक स्वरूप देण्याच्या मार्गावरील हे छोटेसे पाऊल ठरू शकते. अर्थात, हा आशावाद खरा ठरवायचा असेल तर यापुढील संमेलनांतही अशा प्रकारची पावले टाकायला हवीत.
आता यातही एक भीती आहेच. म्हणजे मुख्य साहित्य संमेलनाआधी घेतले एखादे आदिवासी संमेलन, घेतले एखादे महिला संमेलन की मग या घटकांना मुख्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान द्यायलाच नको... तिथे आपली आणि आपल्या पिट्ट्यांचीच घोडी नाचवायची, असला बेरकी हिशेब तसलीच बेरकी मंडळी करू शकतात. आणि भोळसट, भाबडी मंडळी त्यास भुलू शकतात. तसे होता कामा नये. या घटकांना मुख्य संमेलनाच्या व्यासपीठावरही स्थान मिळालेच पाहिजे. आणि तेही त्यांच्यावरील उपकार म्हणून नव्हे, तर तो त्यांचा हक्क आहे, म्हणून.
ठाणे संमेलनाच्या उद्घाटकपदाची खुचीर् रिकामी आहे. त्यामुळे महामंडळाचा ध्वज फडकावून संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्या ध्वजाच्या सोबतीला काही नवे-वेगळे (भले त्याचा आवाका कमी असेल) आकाशात फडकू पहात आहे. त्याचे स्वागत करायला हवे!
0 comments:
Post a Comment