राजीव काळे
शस्त्रवाल्यांचा सांस्कृतिक दबदबा लक्षात घेता ते सांगतील ती पूर्वदिशा, असा समज होण्याचा आणि काळ्या दगडावर त्यांचीच रेघ उमटण्याचा धोका खूप. या मंडळींकडून दान घेणा-याबाबत तर हा धोका अधिकच. आणि हे दान देणारे आणि दान घेणारे या वर्तुळाबाहेरील अक्षरवाचकांचे काय? की त्यांना या सगळ्या व्यवहारात गावकुसाबाहेर ठेवायचे? ही तर चातुर्वर्णासारखी त्रिवणीर् व्यवस्था झाली. चातुर्वर्ण व्यवस्थेने आपल्या समाजाचे काय झाले, ते सर्वज्ञात आहे. त्रिवर्ण व्यवस्थेने साहित्याचे काही वेगळे होईल, अशी आशा बाळगण्यास जागा नाही.
..................
... तर ही व्यवस्था मस्तच. म्हणजे समोर येईल त्या कवितेचे, कथेचे, कादंबरीचे, किंवा मग समजा कुणी केलाच प्रयत्न या रूढ साहित्यप्रकारांपेक्षा निराळ्या अशा फॉर्ममधील साहित्य घडवण्याचा, तर त्याचे विच्छेदन करायचे ते आपल्याला भावलेल्या शस्त्रांनी, उपकरणांनी. आता या भावण्याच्या पायात एक मोठा दगड सोयीचा. सोय अनेक पातळ्यांवरची. वैयक्तिक, सामाजिक, साहित्यिक, व्यावहारिक वगैरे. त्यातून साध्य करायच्या गोष्टी अनेक. आणि त्यातील अनेक साहित्यबाह्य. त्याविषयी येथे न बोलणेच श्रेयस्कर. मग बोलायचे कशावर? तर, या विच्छेदनर्कत्यांच्या हाती असलेल्या शस्त्रांवर... उपकरणांवर.
ही शस्त्रे विविध प्रकारची आणि धारदार. आणि प्रत्येक शस्त्रावर वेगवेगळी लेबले डकवलेली. रूपवाद, मार्क्सवाद, देशीवाद, वच्छंदतावाद, कलावाद, वास्तववाद, आदिबंधवाद, व्यक्तिवाद, समाजवाद... लेबलांना तोटा नाही. ती लेबले ज्यावर डकवायची त्या शस्त्रांना तोटा नाही. ती शस्त्रे ज्या हातात असणार त्यांना तोटा नाही. हे हात ज्या मेंदूच्या आज्ञेनुसार चालणार त्या मेंदूंना तोटा नाही. हे सारे मेंदू कमालीचे तल्लख आणि चाणाक्ष. त्यांचे भरणपोषण जाड्याजाड्या पुस्तकांवर, ग्रंथांवर झालेले. त्या ग्रंथांतील सारा रस त्यांच्या मेंदूंत सुरक्षित. आणि महत्त्वाचे म्हणजे हे सारे मेंदू भावी पिढ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक कल्याणाच्या कामी लागलेले. काम कसले ते, दानच की हो. आणि दान म्हणजे तर महापवित्र. आपली संस्कृतीच सांगते तसे. संस्कृती सांगते म्हणजे खरेच असणार ते. तर ही सारी मंडळी ज्ञानशूर आणि दानशूर. आता त्या पवित्र दानासाठी त्यांना महिन्याच्या महिन्याला भरभक्कम बिदागी मिळते ती सोडा. पण तरीही ती दानशूरच.
या दानशूर मंडळींवर नियतीने सोपवलेली जबाबदारी मोठी आणि ऐतिहासिकही. समोर आलेल्या अक्षरकृतीचे विच्छेदन करणे. आणि त्यातील शब्द न् शब्द वेगळा करणे. त्या शब्दांच्या मुळाशी कुठला रस वाहतो आहे, याचा तपास करणे. कालगतीच्या पटलावर त्यांची ऐतिहासिकता मोजणे. हा सव्यापसव्य करण्यात प्रत्येक मेंदू आपापली वाट शोधणार. आता अशा प्रकारे स्वतंत्ररीत्या वाट शोधण्यात चूक काय? तर काहीच नाही. मेंदू असलेल्या प्रत्येकाने अवश्य करावी, अशीच ही गोष्ट. प्रश्न एकच. मेंदू चालवताना डोळे टक्क उघडे ठेवायचे की हाती असलेली शस्त्रेच चालवण्याचा अट्टहास धरायचा, त्यांच्या पलीकडे काही पहायचेच नाही का, हा. एका मर्यादेपर्यंत ती तशीही चालवण्यात हरकत नाही. पण त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे केवळ आपल्या हाती असलेली शस्त्रेच खरी... इतरांच्या हाती असलेली शस्त्रे म्हणजे हंबग, असला विचार शस्त्रवाल्यांनी मांडावा का, असा. त्यावर कहर म्हणजे आपल्या हाती जी शस्त्रे आहेत त्यांवर डकवलेली लेबलेच डकवता येईल, अशीच अक्षरकृती त्याच्या निर्मात्यांनी निर्माण करावी, असा उघड वा छुपा हट्ट धरणे. हा तर अक्षरपातळीवरचा दहशतवादच की.
आता, हाती कुठली शस्त्रे हाती घ्यायची, केवळ त्यांचाच हट्ट धरायचा का हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असला आणि त्यात प्रत्येकाच्या बुद्धीच्या, दृष्टीच्या आवाक्याचा संबंध असला तरी त्यातून होणारे नुकसान कोण भरून काढणार? कारण शस्त्रवाल्यांचा सांस्कृतिक दबदबा, त्यांची पत हे लक्षात घेता ते सांगतील ती पूर्वदिशा असा समज होण्याचा आणि काळ्या दगडावर त्यांचीच रेघ उमटण्याचा धोका खूप. विशेषत: या मंडळींकडून दान घेणाऱ्यांबाबत तर हा धोका अधिकच. आणि अपवाद वगळता ही रेघ खरोखरच मोठी होण्याच्या योग्यतेची असेलच, याची हमी देण्यासारखीही परिस्थिती नाही. दान घेणारी मंडळी आदल्यांकडून हाती आलेले तेच दान नंतर पुढल्यांच्या हाती देणार. ही साखळी अशीच सुरू राहणार. त्यात वैचारिक खुलेपणा बुडणार आणि आपापल्या मार्गांवरील वाटचाल, त्यांचेच उदात्तीकरण आणि इतर वाटांच्या नावाने बोटे मोडणे जारी राहणार. शिवाय हे दान देणारे आणि दान घेणारे या वर्तुळाबाहेरील अक्षरवाचकांचे काय? की त्यांना या सगळ्या व्यवहारात जमेसच धरायचे नाही? त्यांना गावकुसाबाहेरच ठेवायचे? ही तर चातुर्वर्णासारखी त्रिवणीर् व्यवस्था झाली. त्यातून शस्त्रवाल्यांची पोटे भरत असतील, त्यांच्या हाती मानसन्मान पडत असतील, पण त्यातून इतरांचे खऱ्या अर्थाने कल्याण होणे कठीणच.
चातुर्वर्ण व्यवस्थेने आपल्या समाजाचे काय झाले, ते सर्वज्ञात आहे. या त्रिवर्ण व्यवस्थेने साहित्याचे काही वेगळे होईल, अशी आशा बाळगण्यास जागा नाही.
शस्त्रवाल्यांचा सांस्कृतिक दबदबा लक्षात घेता ते सांगतील ती पूर्वदिशा, असा समज होण्याचा आणि काळ्या दगडावर त्यांचीच रेघ उमटण्याचा धोका खूप. या मंडळींकडून दान घेणा-याबाबत तर हा धोका अधिकच. आणि हे दान देणारे आणि दान घेणारे या वर्तुळाबाहेरील अक्षरवाचकांचे काय? की त्यांना या सगळ्या व्यवहारात गावकुसाबाहेर ठेवायचे? ही तर चातुर्वर्णासारखी त्रिवणीर् व्यवस्था झाली. चातुर्वर्ण व्यवस्थेने आपल्या समाजाचे काय झाले, ते सर्वज्ञात आहे. त्रिवर्ण व्यवस्थेने साहित्याचे काही वेगळे होईल, अशी आशा बाळगण्यास जागा नाही.
..................
... तर ही व्यवस्था मस्तच. म्हणजे समोर येईल त्या कवितेचे, कथेचे, कादंबरीचे, किंवा मग समजा कुणी केलाच प्रयत्न या रूढ साहित्यप्रकारांपेक्षा निराळ्या अशा फॉर्ममधील साहित्य घडवण्याचा, तर त्याचे विच्छेदन करायचे ते आपल्याला भावलेल्या शस्त्रांनी, उपकरणांनी. आता या भावण्याच्या पायात एक मोठा दगड सोयीचा. सोय अनेक पातळ्यांवरची. वैयक्तिक, सामाजिक, साहित्यिक, व्यावहारिक वगैरे. त्यातून साध्य करायच्या गोष्टी अनेक. आणि त्यातील अनेक साहित्यबाह्य. त्याविषयी येथे न बोलणेच श्रेयस्कर. मग बोलायचे कशावर? तर, या विच्छेदनर्कत्यांच्या हाती असलेल्या शस्त्रांवर... उपकरणांवर.
ही शस्त्रे विविध प्रकारची आणि धारदार. आणि प्रत्येक शस्त्रावर वेगवेगळी लेबले डकवलेली. रूपवाद, मार्क्सवाद, देशीवाद, वच्छंदतावाद, कलावाद, वास्तववाद, आदिबंधवाद, व्यक्तिवाद, समाजवाद... लेबलांना तोटा नाही. ती लेबले ज्यावर डकवायची त्या शस्त्रांना तोटा नाही. ती शस्त्रे ज्या हातात असणार त्यांना तोटा नाही. हे हात ज्या मेंदूच्या आज्ञेनुसार चालणार त्या मेंदूंना तोटा नाही. हे सारे मेंदू कमालीचे तल्लख आणि चाणाक्ष. त्यांचे भरणपोषण जाड्याजाड्या पुस्तकांवर, ग्रंथांवर झालेले. त्या ग्रंथांतील सारा रस त्यांच्या मेंदूंत सुरक्षित. आणि महत्त्वाचे म्हणजे हे सारे मेंदू भावी पिढ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक कल्याणाच्या कामी लागलेले. काम कसले ते, दानच की हो. आणि दान म्हणजे तर महापवित्र. आपली संस्कृतीच सांगते तसे. संस्कृती सांगते म्हणजे खरेच असणार ते. तर ही सारी मंडळी ज्ञानशूर आणि दानशूर. आता त्या पवित्र दानासाठी त्यांना महिन्याच्या महिन्याला भरभक्कम बिदागी मिळते ती सोडा. पण तरीही ती दानशूरच.
या दानशूर मंडळींवर नियतीने सोपवलेली जबाबदारी मोठी आणि ऐतिहासिकही. समोर आलेल्या अक्षरकृतीचे विच्छेदन करणे. आणि त्यातील शब्द न् शब्द वेगळा करणे. त्या शब्दांच्या मुळाशी कुठला रस वाहतो आहे, याचा तपास करणे. कालगतीच्या पटलावर त्यांची ऐतिहासिकता मोजणे. हा सव्यापसव्य करण्यात प्रत्येक मेंदू आपापली वाट शोधणार. आता अशा प्रकारे स्वतंत्ररीत्या वाट शोधण्यात चूक काय? तर काहीच नाही. मेंदू असलेल्या प्रत्येकाने अवश्य करावी, अशीच ही गोष्ट. प्रश्न एकच. मेंदू चालवताना डोळे टक्क उघडे ठेवायचे की हाती असलेली शस्त्रेच चालवण्याचा अट्टहास धरायचा, त्यांच्या पलीकडे काही पहायचेच नाही का, हा. एका मर्यादेपर्यंत ती तशीही चालवण्यात हरकत नाही. पण त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे केवळ आपल्या हाती असलेली शस्त्रेच खरी... इतरांच्या हाती असलेली शस्त्रे म्हणजे हंबग, असला विचार शस्त्रवाल्यांनी मांडावा का, असा. त्यावर कहर म्हणजे आपल्या हाती जी शस्त्रे आहेत त्यांवर डकवलेली लेबलेच डकवता येईल, अशीच अक्षरकृती त्याच्या निर्मात्यांनी निर्माण करावी, असा उघड वा छुपा हट्ट धरणे. हा तर अक्षरपातळीवरचा दहशतवादच की.
आता, हाती कुठली शस्त्रे हाती घ्यायची, केवळ त्यांचाच हट्ट धरायचा का हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असला आणि त्यात प्रत्येकाच्या बुद्धीच्या, दृष्टीच्या आवाक्याचा संबंध असला तरी त्यातून होणारे नुकसान कोण भरून काढणार? कारण शस्त्रवाल्यांचा सांस्कृतिक दबदबा, त्यांची पत हे लक्षात घेता ते सांगतील ती पूर्वदिशा असा समज होण्याचा आणि काळ्या दगडावर त्यांचीच रेघ उमटण्याचा धोका खूप. विशेषत: या मंडळींकडून दान घेणाऱ्यांबाबत तर हा धोका अधिकच. आणि अपवाद वगळता ही रेघ खरोखरच मोठी होण्याच्या योग्यतेची असेलच, याची हमी देण्यासारखीही परिस्थिती नाही. दान घेणारी मंडळी आदल्यांकडून हाती आलेले तेच दान नंतर पुढल्यांच्या हाती देणार. ही साखळी अशीच सुरू राहणार. त्यात वैचारिक खुलेपणा बुडणार आणि आपापल्या मार्गांवरील वाटचाल, त्यांचेच उदात्तीकरण आणि इतर वाटांच्या नावाने बोटे मोडणे जारी राहणार. शिवाय हे दान देणारे आणि दान घेणारे या वर्तुळाबाहेरील अक्षरवाचकांचे काय? की त्यांना या सगळ्या व्यवहारात जमेसच धरायचे नाही? त्यांना गावकुसाबाहेरच ठेवायचे? ही तर चातुर्वर्णासारखी त्रिवणीर् व्यवस्था झाली. त्यातून शस्त्रवाल्यांची पोटे भरत असतील, त्यांच्या हाती मानसन्मान पडत असतील, पण त्यातून इतरांचे खऱ्या अर्थाने कल्याण होणे कठीणच.
चातुर्वर्ण व्यवस्थेने आपल्या समाजाचे काय झाले, ते सर्वज्ञात आहे. या त्रिवर्ण व्यवस्थेने साहित्याचे काही वेगळे होईल, अशी आशा बाळगण्यास जागा नाही.
0 comments:
Post a Comment